ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.
लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो,
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.
आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना,
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न पुर्ण होता होता तुटताना.
गोष्टी संपतात लोक बदलतात
आयुष्यही पुढे जाते,
वेळ ही कोणासाठी थांबत नाही
आणि नेमकं हेच आपल्याला कळतं नाही.
खूप प्रेम केलं होतं तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती तिची
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
माझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.
आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते,
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते.
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.