
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.

आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते,
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते.

माझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.

खूप प्रेम केलं होतं तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती तिची
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

गोष्टी संपतात लोक बदलतात
आयुष्यही पुढे जाते,
वेळ ही कोणासाठी थांबत नाही
आणि नेमकं हेच आपल्याला कळतं नाही.

आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना,
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न पुर्ण होता होता तुटताना.

लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो,
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.

नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.

मनातल्या भावना तुला सांगायला
मी थोडा घाबरतोय,
तुच कधीतरी समजुन घेशील
अशी आशा मी करतोय.

ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते,
मग तिचं मला सोडून जाणे
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

विसरून जा तिला जी तुला विसरेल
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून
जी स्वतः रडून जी तुला हसवेल.

परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस,
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.

मी तिला माफ केलं
कारण माझं तिच्यावर प्रेम होत,
तीनं मला धोका दिला
कारण तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं.

कळत नाही आज का
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का
एकटेपणाची जाणीव होत आहे.

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी किती.

जेव्हा भूतकाळाच्या आठवणी ताज्या होतात,
तेव्हा भरलेल्या जखमा
नकळत पुन्हा चिघळल्या जातात.

कोणाला सापडणार नाही
इतकं सार माझे हरवलय,
आणि कोणाला सापडल तरी
ओळखायच नाही असं ठरवलय.

कधी वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर साथ सोडशील,
भेटली तर अशी होतीस
जशी सात जन्म साथ देशील.

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद! तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस.

जाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करून सुद्धा जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

चेहऱ्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं,
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं.

पहिलं प्रेम हे लहानपणाच्या
जखमे सारखं असतं,
जखम तर भरते पण
त्या जखमेची आठवण मात्र कायम राहते.

तु सोडून गेलीस मला तरी
मी वाट पाहणार,
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

कोण म्हणत प्रेम एकदाच होतं,
ज्यांना हृदयाशी खेळायला जमतं
त्यांना पुन्हा पुन्हा होतं.

काही लोकांना सवय असते
उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं,
आणि गरज संपली की सोडून द्यायचं.

प्रेम मी ही केलं, प्रेम तिनं ही केलं
फरक फक्त एवढाच होता की
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.

ती मला नेहमी म्हणायची की,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तिचं करूनच सोडलं.

लोक तुटलेला तारा पाहुन त्याच्याकडे
इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन हात जोडतात,
पण जो स्वतः तुटलेला आहे
तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.

हसणारा चेहरा तर सगळेच पाहू शकतात,
परंतु तुटलेले हृदय असलेला चेहरा
हे ठरावीक लोकच ओळखु शकतात.

आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.

मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या
प्रवासातला जोडीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत,
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.