आज पर्यत जे बोलता नाही आले
आज ते सारे तुझ्यापुढे बोलणार,
नाही जगु शकत तुझ्याशिवाय
हेच तुला सांगणार.
रस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही.
जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.
एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.
प्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे
पण ते ज्या व्यक्तीवर आहे,
त्या व्यक्तीला पटवून देणं
खुप अवघड आहे.
कोसळणारा पाऊस पाहून
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो.