नाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
माहिती आहे तुझ्या नजरेत
मला काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे,
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा.
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते
शेवटी तूच मला दाखवले.
जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये,
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेल
पण विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.