तुझ्यात आणि माझ्यात
फक्त थोडाच फरक होता.
तुला वेळ घालवायचा होता
आणि मला आयुष्य.
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.
काच बनविणाऱ्याने जर हृदयपण
काचेच बनवलं असतं तर फार बरं झालं असतं,
कमीत कमी तोडणाऱ्याच्या
हाताला जखम तरी झाली असती.
आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,
वाहणारे अश्रू येतात जिथून
मी तो पाट शोधतोय.
श्वास थांबल्यानंतर माणूस एकदाच मरतो,
पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर
माणूस रोज रोज मरतो.
तू सोडून गेल्यानंतर एक गोष्ट
खूप चांगली समजली मला,
की जाणाऱ्या व्यक्तीला का थांबवतात.