तू सोडून गेल्यानंतर एक गोष्ट
खूप चांगली समजली मला,
की जाणाऱ्या व्यक्तीला का थांबवतात.
आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,
वाहणारे अश्रू येतात जिथून
मी तो पाट शोधतोय.
काच बनविणाऱ्याने जर हृदयपण
काचेच बनवलं असतं तर फार बरं झालं असतं,
कमीत कमी तोडणाऱ्याच्या
हाताला जखम तरी झाली असती.
तुझ्यात आणि माझ्यात
फक्त थोडाच फरक होता.
तुला वेळ घालवायचा होता
आणि मला आयुष्य.
तू सोडून गेल्यानंतर एक गोष्ट
खूप चांगली समजली मला,
की जाणाऱ्या व्यक्तीला का थांबवतात.
किती त्रास होतो ना त्यावेळी
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला
आयुष्यभर साथ देण्याचे वचन देवून
आयुष्यभरासाठी निघुन जाते.
श्वास थांबल्यानंतर माणूस एकदाच मरतो,
पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर
माणूस रोज रोज मरतो.
एक वेळ अशी होती की
तेव्हा बोलणचं संपत नव्हते,
आणि एक वेळ अशी आहे की
बोलणचं होत नाही.