खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही,
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
Traffic Signal पाहुन मला सुध्दा
काही लोकांची आठवण येते,
कारण ते सुध्दा असेच रंग बदलत होते.
तोडू नयेत दुसऱ्याची मने
झाडाच्या फांदीसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची तुटतात.
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी
मनाला जखमी व्हावी लागते.
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत.
आजपासून थोडं बदलायचं,
कारण कोणाच्या आयुष्यात
पर्याय म्हणुन नाही राहायचं.
तुला काय फरक पडणार आहे,
मला सोडून जाऊन,
खरं प्रेम तर मी केल होत, तू नाही.
चुक झाल्यावर साथ सोडणारे
खुप असतात पण,
चुक झाल्यावर समजुन घेणारे
फारच कमी असतात.
ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.
Offline गेल्यानंतर एकवेळ
Message येणं बंद होईल,
पण एखाद्याची आठवण येणं
कधीच बंद होत नाही.
जवळीक साधून माझ्याशी
कशी किमया केलीस,
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.