असतात काही माणसं अशी
खोटी नाती जोडणारी,
मनात हक्काच स्थान मिळवून
विश्वासघात करणारी.
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत.
तुला काय फरक पडणार आहे,
मला सोडून जाऊन,
खरं प्रेम तर मी केल होत, तू नाही.
आजपासून थोडं बदलायचं,
कारण कोणाच्या आयुष्यात
पर्याय म्हणुन नाही राहायचं.
ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.
Offline गेल्यानंतर एकवेळ
Message येणं बंद होईल,
पण एखाद्याची आठवण येणं
कधीच बंद होत नाही.
तोडू नयेत दुसऱ्याची मने
झाडाच्या फांदीसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची तुटतात.
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले
खरे प्रेम कशाला म्हणतात.
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी
मनाला जखमी व्हावी लागते.
Traffic Signal पाहुन मला सुध्दा
काही लोकांची आठवण येते,
कारण ते सुध्दा असेच रंग बदलत होते.