जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.
अश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.
माझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.
आपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.
आपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.