जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
अश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.
जे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.
आठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत,
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत.
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
आपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.