अश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.
आपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.
जे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.
कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.