प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.
अश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.
जे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.
आपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.
कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.