आठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत,
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत.
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.
देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.
आपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.
अश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.