मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
काही लोकांना सवय असते
उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं,
आणि गरज संपली की सोडून द्यायचं.
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.
आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.
परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस,
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस.
थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद! तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस.
लोक तुटलेला तारा पाहुन त्याच्याकडे
इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन हात जोडतात,
पण जो स्वतः तुटलेला आहे
तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.
मी तिला माफ केलं
कारण माझं तिच्यावर प्रेम होत,
तीनं मला धोका दिला
कारण तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं.
मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या
प्रवासातला जोडीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
जेव्हा भूतकाळाच्या आठवणी ताज्या होतात,
तेव्हा भरलेल्या जखमा
नकळत पुन्हा चिघळल्या जातात.
नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.
चेहऱ्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं,
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं.
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.
पहिलं प्रेम हे लहानपणाच्या
जखमे सारखं असतं,
जखम तर भरते पण
त्या जखमेची आठवण मात्र कायम राहते.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत,
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो,
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.
माझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.
कोणाला सापडणार नाही
इतकं सार माझे हरवलय,
आणि कोणाला सापडल तरी
ओळखायच नाही असं ठरवलय.
कळत नाही आज का
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का
एकटेपणाची जाणीव होत आहे.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.