जेव्हा भूतकाळाच्या आठवणी ताज्या होतात,
तेव्हा भरलेल्या जखमा
नकळत पुन्हा चिघळल्या जातात.
विसरून जा तिला जी तुला विसरेल
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून
जी स्वतः रडून जी तुला हसवेल.
कळत नाही आज का
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का
एकटेपणाची जाणीव होत आहे.
ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते,
मग तिचं मला सोडून जाणे
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
माझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
तु सोडून गेलीस मला तरी
मी वाट पाहणार,
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत,
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो,
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.
कोण म्हणत प्रेम एकदाच होतं,
ज्यांना हृदयाशी खेळायला जमतं
त्यांना पुन्हा पुन्हा होतं.
मी तिला माफ केलं
कारण माझं तिच्यावर प्रेम होत,
तीनं मला धोका दिला
कारण तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं.
लोक तुटलेला तारा पाहुन त्याच्याकडे
इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन हात जोडतात,
पण जो स्वतः तुटलेला आहे
तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.
आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते,
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते.
खूप प्रेम केलं होतं तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती तिची
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
मनातल्या भावना तुला सांगायला
मी थोडा घाबरतोय,
तुच कधीतरी समजुन घेशील
अशी आशा मी करतोय.
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.
चेहऱ्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं,
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं.
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.