मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.
मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या
प्रवासातला जोडीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
खूप प्रेम केलं होतं तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती तिची
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
जाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करून सुद्धा जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल.
काही लोकांना सवय असते
उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं,
आणि गरज संपली की सोडून द्यायचं.
मी तिला माफ केलं
कारण माझं तिच्यावर प्रेम होत,
तीनं मला धोका दिला
कारण तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
कोणाला सापडणार नाही
इतकं सार माझे हरवलय,
आणि कोणाला सापडल तरी
ओळखायच नाही असं ठरवलय.
चेहऱ्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं,
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं.
ती मला नेहमी म्हणायची की,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तिचं करूनच सोडलं.
कळत नाही आज का
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का
एकटेपणाची जाणीव होत आहे.
गोष्टी संपतात लोक बदलतात
आयुष्यही पुढे जाते,
वेळ ही कोणासाठी थांबत नाही
आणि नेमकं हेच आपल्याला कळतं नाही.
माझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी किती.
परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस,
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस.
आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना,
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न पुर्ण होता होता तुटताना.
आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.
आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते,
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते.
कधी वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर साथ सोडशील,
भेटली तर अशी होतीस
जशी सात जन्म साथ देशील.