ती मला नेहमी म्हणायची की,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तिचं करूनच सोडलं.
मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या
प्रवासातला जोडीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.
तु सोडून गेलीस मला तरी
मी वाट पाहणार,
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार.
थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद! तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस.
काही लोकांना सवय असते
उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं,
आणि गरज संपली की सोडून द्यायचं.
चेहऱ्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं,
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं.
लोक तुटलेला तारा पाहुन त्याच्याकडे
इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन हात जोडतात,
पण जो स्वतः तुटलेला आहे
तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.
पहिलं प्रेम हे लहानपणाच्या
जखमे सारखं असतं,
जखम तर भरते पण
त्या जखमेची आठवण मात्र कायम राहते.
आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना,
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न पुर्ण होता होता तुटताना.
कोणाला सापडणार नाही
इतकं सार माझे हरवलय,
आणि कोणाला सापडल तरी
ओळखायच नाही असं ठरवलय.
लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो,
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.
जेव्हा भूतकाळाच्या आठवणी ताज्या होतात,
तेव्हा भरलेल्या जखमा
नकळत पुन्हा चिघळल्या जातात.
विसरून जा तिला जी तुला विसरेल
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून
जी स्वतः रडून जी तुला हसवेल.
कोण म्हणत प्रेम एकदाच होतं,
ज्यांना हृदयाशी खेळायला जमतं
त्यांना पुन्हा पुन्हा होतं.
आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.
प्रेम मी ही केलं, प्रेम तिनं ही केलं
फरक फक्त एवढाच होता की
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.