ज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना,
तेच लोक
आपला विश्वासघात करतात.
कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे,
असे मोजकेच असतात
तेच आयुष्यभर साथ देतात.
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
प्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे
पण ते ज्या व्यक्तीवर आहे,
त्या व्यक्तीला पटवून देणं
खुप अवघड आहे.
रहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.
जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.
एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे,
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा.
एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
प्रेम त्याच्यावर करा
ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहे,
कारण हृदय तुटण्याचे दुःख
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.
कधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण,
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं.
रस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.
जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात,
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.
छोटे छोटे रिप्लाय
येऊ लागले की समजायचं,
मोठे मोठे मेसेज
दूसरी कडे जात आहेत.
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेल
पण विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.
माहिती आहे तुझ्या नजरेत
मला काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.
प्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.