कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे,
असे मोजकेच असतात
तेच आयुष्यभर साथ देतात.
जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
कधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण,
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं.
कुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.
माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.
कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे,
असे मोजकेच असतात
तेच आयुष्यभर साथ देतात.
प्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.
ज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना,
तेच लोक
आपला विश्वासघात करतात.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेल
पण विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.
एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे,
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा.
होईलच तुला एक दिवस सखे
माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच उणीव.
तुझ्यासाठी बघ मी
किती मोठं मन केलं,
तुला आवडतं खेळायला म्हणून
हृदयाचं खेळणं केलं.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
रहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.
प्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे
पण ते ज्या व्यक्तीवर आहे,
त्या व्यक्तीला पटवून देणं
खुप अवघड आहे.
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा,
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.
एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.