प्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते
शेवटी तूच मला दाखवले.
आज पर्यत जे बोलता नाही आले
आज ते सारे तुझ्यापुढे बोलणार,
नाही जगु शकत तुझ्याशिवाय
हेच तुला सांगणार.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत, माझा हातात हात घे.
होईलच तुला एक दिवस सखे
माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच उणीव.
एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.
कोसळणारा पाऊस पाहून
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो.
कधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण,
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं.
माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.
रहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.
तुझ्यासाठी बघ मी
किती मोठं मन केलं,
तुला आवडतं खेळायला म्हणून
हृदयाचं खेळणं केलं.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.
छोटे छोटे रिप्लाय
येऊ लागले की समजायचं,
मोठे मोठे मेसेज
दूसरी कडे जात आहेत.
माहिती आहे तुझ्या नजरेत
मला काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेल
पण विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.
तुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.