माहिती आहे तुझ्या नजरेत
मला काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
कुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.
रहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.
प्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही.
एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.
जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.
एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे,
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा.
माहिती आहे तुझ्या नजरेत
मला काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत, माझा हातात हात घे.
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
तुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.
रस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा,
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.