कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे,
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा.
तुझ्यासाठी बघ मी
किती मोठं मन केलं,
तुला आवडतं खेळायला म्हणून
हृदयाचं खेळणं केलं.
रस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
रहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.
प्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
कधीतर संपेल ना हा त्रास
संपेल कधी तर हा एकटेपणा,
चार दिवसाच्या आयुष्यात
एक दिवस तरी चांगला असेलच ना.
कोसळणारा पाऊस पाहून
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो.
ज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना,
तेच लोक
आपला विश्वासघात करतात.
भावना मलाही आहेत
पण त्या मुक्त करता येत नाहीत,
गहिवरल्या मनातून त्या
व्यक्त करता येत नाहीत.
कधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण,
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं.
प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचं
आता परत रडायची इच्छाच नाही.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
कुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.
तुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.
प्रेम त्याच्यावर करा
ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहे,
कारण हृदय तुटण्याचे दुःख
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.
जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात,
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.