नाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये,
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.
जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे,
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा.
रस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत, माझा हातात हात घे.
छोटे छोटे रिप्लाय
येऊ लागले की समजायचं,
मोठे मोठे मेसेज
दूसरी कडे जात आहेत.
कधीतर संपेल ना हा त्रास
संपेल कधी तर हा एकटेपणा,
चार दिवसाच्या आयुष्यात
एक दिवस तरी चांगला असेलच ना.
जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
तुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.
प्रेम त्याच्यावर करा
ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहे,
कारण हृदय तुटण्याचे दुःख
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.
एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते
शेवटी तूच मला दाखवले.
होईलच तुला एक दिवस सखे
माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच उणीव.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही.
कोसळणारा पाऊस पाहून
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.
प्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे
पण ते ज्या व्यक्तीवर आहे,
त्या व्यक्तीला पटवून देणं
खुप अवघड आहे.