आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.
खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.