जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
आयुष्य खूप लहान आहे, महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका.