आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.
कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.