आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तर तो मागे फिरत नाही.
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.