आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.
आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.
राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो.
माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.