जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.
आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.
माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.
खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
आयुष्य खूप लहान आहे, महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.
आयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडा, कमी वेळात यशस्वी व्हाल.