आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.
आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.
खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.
ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तर तो मागे फिरत नाही.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो.
राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.