आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे.