आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो.
आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.