माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.