आयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडा, कमी वेळात यशस्वी व्हाल.
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.
खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.
स्वतः ला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे.
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.