खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.
राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.