आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो.
खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.
जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे.