राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तर तो मागे फिरत नाही.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.